ऒढ मिलनाची
ऒढ सागराची बांधही फोडीत गेली
मार्गातील सगळ्यांना आकंठ बुडवित गेली //१//
ती आस मुरारीची व्याकूळ बनवून गेली
अवखळ राधेतील वात्सल जागवून गेली //२//
तृषार्थ चातकाची तृष्णा शमवून गेली
ती धार मृगाची तृप्त करुन गेली //३//
मिलनास पृथ्वीराजाच्या भारावून गेली
ती संमयुक्ता अल्लड भांबावून गेली //४//
ऒढ दिप्तीची वेड लावून गेली
पतंगास त्या सत्वरी जाळून गेली //५//
वर्णन दमयंतीचे, नलास मोहून गेले
हंसास बिचा-या जीवनदान देऊन गेले //६//
आकर्षण वसुंधरेचे आभाळास नमवून गेले
दोघांना दूर क्षतिजावर भेटवून गेले //७//
स्वप्ने तुझी रात्र जागवून गेली
आस मिलनाची कविता स्फुरवुन गेली //८//
-सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)
wow.......no words 4 dis.....ur marathi literature is really 2 gud......
ReplyDelete