Mar 21, 2010

I'am off

am I addicted to FACEBOOK, or INTERNET?????

'NO ooooooooooo" :)

This thought is very disturbing, a human being don't want to feel that he has not in control of his own mind.
& i dn't want to feel like i'am not in control.

so to prove that i'am in control of myself, i'am willing going off (not using net especially FB) for some days.

I will be back after some days, when fully satisfied that i'am in full control.
so friends do miss me, & remember me when i will return.

This is Sourabh Paranjape signing ooooooooooooffffffffffffffff

byeeeeeeeeeee :))

वे द ने ची संवेदना-२ (विस्तिर्ण)

’वेदनेची संवेदना’ ही गज़ल लिहिल्यानंतर, मला आणकी अनेक रुपक, कल्पना सुचल्या, त्यांना मी आधीच्या ’वेदनेची संवेदना’ या काव्याला जोडणी (extension) म्हणून देत आहे.

हिंदीतील महाकवी श्री. हरिवंशराय बच्चन यांचे ’मधुशाला’ हे काव्य मी वाचले आहे. मधुशालेने मला खुपच प्रभावित केले.  मधुशालेनेचा माझ्या मनावरील पगडा एवढा जबरदस्त होता/आहे की एकवेळ मला अख्खी
’मधुशाला’ मुखोग्दत होती.
श्री, हरिवंशराय बच्चन यांनी मनातील विविध अवस्थांनाच प्रतिक बनवले आहे आणि हाला, प्याला, साकी, मधुशाला यांना घेऊन अनेक सुंदर कल्पनांवर भाष्य केले आहे.

माझ्या मते ’मधुशालेचा’ प्रभाव ’वेदनेची संवेदना’ वर प्रामुख्याने जाणवतो, नव्हे मधुशालेनेच मला प्रेरित केले आणि म्हणूनचं हे ’वेदनेची संवेदना जोडणी’ (extension) मी श्री, हरिवंशराय बच्चन यांना मनपूर्वक अर्पण करित आहे.

’वेदनेची संवेदना जोडणी’ (extension) देत आहे, ’वेदनेची संवेदना’ काव्यासाठी आधीचे याच नावाने असलेले पोस्ट पाहावे ही विनंती.






वे द ने ची संवेदना-२

सामर्थ वेदनेचे धडकी भरवाया लागले
अन् सारे वेदनेला शरण जावया लागले (१२)


साम्राज्य वेदनेचे चौदिशा वाढाया लागले
लोक वेदनेचे मांडलिक व्हाया लागले (१३)


(मी) वेदनेच्या मोहात फसण्या लागलो
मजला वेदनेचे लावण्य भुलवू लागले (१४)


मातेसम वेदना मज पाजु लागली
वात्सल्यरुपी वेदनेचे रुप पाहु लागलो (१५)


वेदना सूर्यासम मज झोकाळू लागली
तिमिराकडून तेजाकडे नेऊ लागली (१६)


वेदना सागरासम मज खोली देऊ लागली
शिंपल्यातील अमुल्य मोती बनवू लागली (१७)


वेदना छिन्नीसम मजला तराशू लागली
सुंदर- सुबक शिल्प साकारु लागली (१८)


वेदना मज काव्यत्म आयाम देऊ लागली
अत्तुच्च प्रतिभेचा साषा(क्ष)त्कार घडवू लागली (१९)


आकाशासम वेदना मज विस्तारु लागली
अन् सामावण्याच्या कषा(क्ष) रुंदाऊ लागली (२०)


अनंतरुपी वेदनेचे दर्शन घडण्या लागले
प्रतिक्षण वेदनेचा कुंदन बनवाया लागला (२१)


वेदना गुरुसम मज घडवाया लागली
प्रतिदिन गुरु दषि(क्ष)णा मागाया लागली (२२)


मीही अर्जुनासम वेध घ्याया लागलो
एकलव्यासम अंगठा द्याया लागलो (२३)


कल्पतरुसम वेदना वाछित देऊ लागली
आधीच फाटकी झोळी (माझी) सांडण्या लागली (२४)


वेदना प्रस्थापित समजूती हलवू लागली
नव द्रुष्टीकोनाचे  दर्षन घडवू लागली (२५)


मीही वेदचे उपकार मानाया लागलो
तिच्या ऋणात राहाण्या लागलो (२६)


वेदनेने सारे पांडित्य गळाया  लागले
अन् अंतिम सत्य समजा या लागले (२७)


वेदना जळी-स्थळी-काष्ठी व्यापाया लागली
मज महाकाय विश्वरुप दाखवाया लागली (२८)


वेदनेच्या भावनेत वाहावया लागलो
वेदना एकाकीपणे सोसावया लागलो (२९)

मीही अंतर्मुख व्हावया लागलो

वेदनेवर चिंतन करावया लागलो (३०)

दु:ख, दारिद्र, वेदना खिन्न कराया लागले

आनंदाचे ही मज ऒझे वाटावया लागले (३१)


वेदना गात्रे शांत कराया लागली, मज
पंच महाभूतात विलीन करण्या लागली (३२)

वेदनेने मीही पुण्यकर्म करण्या लागलो

स्वर्गाचे दार ठोठावया लागलो (३३)

वेदना अंतचक्ष(ऊ) उघडाया लागली

ड्यानेद्रिये तीश्ण कराया लागली (३४)

वेदनेमुळे कविता जगाया लागलो, मीही

रोज नवे काव्य कराया लागलो (३५)






              - सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)




Copyrighted Literature / Any illegal usage will be treated as copyright violation under Indian Copyright Act 1957

Mar 19, 2010

वे द ने ची संवेदना (एक गज़ल)


जीवन म्हणजे सुख-दु:ख यांचा मिलाफ, पण नीट बघता  असे आढळून येते की सुखापेक्ष दु:खाचे प्रमाण अधिक असते. सामान्यजन सुख चांगले आणि दु:ख वाईट अशी सर्वसाधारण वर्गवारी करतात. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचे चांगले/वाईट असे वर्गिकरण केले की मग सगळेच संदर्भ बदलतात.
अनेक जणांना दु:खाचे आघात पचवता न आल्याने ते जीवन संपवण्याचा दुदैवी निर्णय घेतात.
तसे बघितले तर दु:ख अत्यंत जरुरीचे आहे. आश्चर्य वाटताय ना?? पण कल्पना करा की जगातील दु:खचं नाहीसे झाले, तर आपणास सुखाचे/आनंदाचे महत्वचं कळणार नाही. दु:ख आहे म्हणून सुख आहे. उलट  दु:खामूळे सुखाचे महत्व वाढले आहे.
दु:खामुळेच अनेक कलाकारांच्या हातून श्रेष्ठ कलाक्रुति तयार झाल्या आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आग्राचा ’ताजमहाल’. शहाजहानला मुमताजमहल हीचा विरह सहन न झाल्यामुळे, तिच्या चिरंतन स्म्रुतीसाठी जे स्मारक बांधण्यात आले ते म्हणजे ’ताजमहाल’.
अनेक कवींनी, शायरांनी दु:ख, दर्द, वेदना यांच्यावर असंख्य रचना केल्या आणि अमर झाले.
वानगी दाखल एक  उदाहरण देत आहे.

हमपे दु:खके पर्बत टुटे तो हमने शेर दो-चार कहे
उनमे क्या गुजरी होगी जिन्होने शेर हजार कहे

तेव्हा दु:खाला, वेदनेला डोईजड होऊ न देता, त्यावर विजिगीषु व्रुत्तीने मात करणे अधिक श्रेयसकर.
हे मान्य की असे सल्ले देणे सोपे आहे, हे ही मान्य की दु:ख अपार आहे व ते झेलत जीवन व्यतित करणे अत्यंत कठीण आहे. पण असे करणारे आपण या जगात एकटेच नाहीत. अनेक संत, महात्मे
, राजे-महाराजे यांनाही दु:ख टाळता आले नाही. प्रभु श्रीरामांनाही जेथे १४ वर्षाचा वनवास भोगावा लागला, तेथे आपली काय तह्रा.
आपल्या आजु-बाजुला असे अनेक आदर्श आहेत ज्यांनी दु:खावर, वेदनेवर यशस्वीरीत्या मात केली आहे. तेव्हा दु:खाला शरण न जाता दु:खावर स्वार होऊया, आणि आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवूया.

खाली एक स्वयंरचित ’गज़ल’ देत आहे.


 वे द ने ची संवेदना

एवढे आले की मज दु:ख आवडाया लागले
अन् सुखाचे मग वावडे वाटाया लागले (१)


रोज मी वेदनेला कुरवाळाया लागलो
अन् तिच्यासाठी जखमाही उकराया लागलो (२)


वेदना शमताच पुन्हा जागवाया लागलो
वेदनेला रोमरोमात भिनवाया लागलो (३)


वेदनेची वासना जेव्हा वाढावया लागली
परमेश्वराकडे वेदनेची कामना कराया लागलो (४)


सुख अव्हेरुन वेदना कवटाळाया लागलो
र्शुंगारासम वेदना भोगावया लागलो (५)


वेदनेच्या नसण्याने व्याकुळ व्हाया लागलो
प्रार्थनेत ही वेदनेची याचना कराया लागलो (६)


वेदनेच्या संवेदनेने बेभान व्हाया लागलो
वेदनेचे हलाहल लिलया पचवाया लागलो (७)


वेदनेच्या धुंदित जेव्हा झिंगाया लागलो
मदिरेसम वेदना तेव्हा प्यावया लागलो (८)


फ़क्त वेदनाचं शाश्वत मानावया लागलो
वेदना सखी-सोबती सर्वां सांगावया लागलो (९)


वेदना अमुल्य/अलौकिक मानावया लागलो
वेदनेला इतरांपासुन लपवाया लागलो (१०)


दुसरयांच्या वेदनेची आस धराया लागलो
त्यांच्या वेदनेला (ही) आपली मानावया लागलो (११)

                              - सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)


द्यानपिठ पुरस्कार विजेते कविवर्य वि. दा. करंदिकर यांस मनपुर्वक अर्पण (आदरांजली)


Copyrighted Literature / Any illegal usage will be treated as copyright violation under Indian Copyright Act 1957

Mar 17, 2010

ग़ज़ल



इतरांप्रमाणे ग़ज़ल किंवा उर्दू शायरीशी माझी प्रथम ओळख हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून झाली. ग़ज़ल ची दिलखेचक आशिकी अदा मनामध्ये लगेचच घर करुन गेली. थोडया, मोजक्याच शब्दात बरेच काही सांगण्याची हतोटी असलेला हा काव्य प्रकार उर्दू आणि हिंदी एवढाच मराठी मध्येही लोकप्रिय आणि प्रचलित आहे.


पर्शियन भाषेत ’ग़ज़ाल’ या शब्दाचा अर्थ हरिण असा आहे. हरिणाच्या पाड़साला ’ग़ज़ाल’ असे म्हणतात. हरिण या शब्दातचं हालचालीतील लालित्य आणि सौदर्य अभिप्रेत असल्यामुळे कदाचित अत्यंत नाजुक हळव्या भावना साकारणारया काव्यप्रकाराला ’ग़ज़ाल’ हे नाव दिले गेले असावे. (१)


या आवडितूनचं "नजराणा शायरीचा" हे संगिता जोशी यांचे पुस्तक विकत घेतले, आणि आधाशासारखे वाचुन काढले. त्यातूनचं आणखी गोडी निर्माण झाली, मग प्रा. डाँ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांचे "ग़ज़ल" हे पूर्णपेणे या विषयाला वाहिलेले पुस्तक वाचले. त्यातील शायरी बरोबरच मीर तकी मीर, मिर्ज़ा ग़ालिब, फ़िराक़ गोरखपुरी इ. थोर शायरांची छोटेखानी तोंडओळख झाली. (२)  मिर्ज़ा ग़ालिब यांना कोण ओळखत नाही.


मराठीमध्ये प्रथम ग़ज़ल कोणि आणली यावरुन अभ्यासकांनमध्ये मतभेद आहेत. योगिराज ड्न्यानेश्वर (शब्द नीट न लिहील्याबद्दल शमस्व) आणि रामदास यांच्या रचनेत अनेक ग़ज़लसद्रुश रचना आढळतात.
कविवर्य अम्रुतराय यांनी स्वच्छ ग़ज़लरचना केल्या. त्यानंतर माधव ज्युलियन, सुरेश भट यांनी ग़ज़ल मराठीत लिहील्या. पण ग़ज़ल मराठीमध्ये लोकप्रिय करण्याचे श्रेय निर्विवादपणे सुरेश भट यांनाचं जाते. (३)

त्यानंतर अनेकांनी मराठीमध्ये ग़ज़ल लिहील्या प्रा. डाँ. सुरेशचंद्र नाडकर्णी, राजेद्र अत्रे, बजरंग सरोदे, इलाही जमादार इ. हा काव्य प्रकार समर्थपणे हाताळला.

ग़ज़ल गायक भिमराव पांचाळ यांनी आपल्या रसाळ गायकिने ग़ज़ल समस्त रसिकांनपर्यंत पोहोचविली, हल्ली त्यांचे लोकसत्तामधील ग़ज़लेवरील छोटेखानी सदर अत्यंत वाचनिय असते.

मला स्वत:ला ग़ज़ल, उर्दू शायरी खुप आवडते, त्यातूनच मीर तकी मीर, मिर्ज़ा ग़ालिब, सुरेश भट यांच्या अनेक ग़ज़ला मी पाठ केल्या आणि कुठे संधी मिळताच (घरगूती बैठक, मैफ़िलींमध्ये) म्हणुन  दाखवल्या.
या थोर ग़ज़लकारांकडुन प्रेरणा घेऊन मीही काही रचना केल्या आहेत, खाली त्यापैकीच एक स्वत: केलेली ग़ज़ल देत आहे.

संदर्भ :  (१), (२), (३) :  "ग़ज़ल" प्रा. डाँ. सुरेशचंद्र नाडकर्णी 
          
टिप  :  वरिल मान्यवरांचे चित्र
             (१) मिर्ज़ा असदुल्ला खाँ ’ग़ालिब’
             (२) मीर तकी ’मीर’
             (३) सुरेश भट




’माझी ग़ज़ल’

ना मी माझा, ना मी कुणाचा राहिलो
एकटा आलो इथे, मी एकटा हा चाललो

काय सांगावे जगिची आगळीच आहे तह्रा
राहुनी गर्दित सारया, एकटा मी आहे बरा

का कुणा जाउन सांगु माझिया मनाची व्यथा
येथला हर एक आहे आपल्या दुनियेत सदा

जाणिवाच सगळ्यांच्या आहेत जेथे गोठलेल्या
मी तरी राहु कसा अपवाद तेथे एकला

                                    - सौरभ

ग़ज़ल मराठीमध्ये लोकप्रिय करणारया कविवर्य सुरेश भट यांना मनपुर्वक समर्पित.










Mar 15, 2010

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

आज गुढीपाडव्या निमित्त, सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नववर्ष सगळ्यांना आनंदाचे, उत्साहाचे जावो ही प्रभु श्रीरामांच्या चरणी प्रार्थना

आला आला गुढीपाडवा, स्वागत करुया नववर्षाचे
बांधुनी गुढी आपुल्या दारी,  स्वागत करुया श्रीरामांचे

आजच्या दिवशी प्रभु श्रीराम, माता सिता, भ्राता लक्षमण १४ वर्षाचा वनवास संपवुन अयोध्येत परतले. मांगल्याचा वाईटावरील विजय साजरा करण्यासाठी व श्रीरामांचे स्वागत करण्यासाठी अयोध्यावासीयांनी गुढया उभारल्या.


या मंगल समयाचे वर्णन करणारी एक स्वरचित कविता प्रभु श्रीरामांच्या चरणि अर्पण करित आहे.




वनवासी श्रीराम परतले घरी
बहुत बरस राहिले वनी
हर्षले नगरजन, आले स्वागत करण्या
आनंदले पाहुनी श्रीरामांसी 
संगे माता सिता, भ्राता लक्षमणासी
रोमांचित क्षण ते होते
वाटेवरती फ़ुलांचे सडे
वाजती सनई आणि चौघडे
लाडका राजपुत्र येता क्षणी
बांधती अयोध्यावासी गुढी
आला दुग्ध-शर्करा योग
पाहुनी तयांचे मुखकमल
जयघोष करती जन
काय सांगावे वर्णन त्या समईचे
पडे माझी प्रतिभा तोकडी
-सौरभ

माझ्या काही कविता- नवी सकाळ

            
      छंद - मक्तछंद


पुन्हा एक नवी सकाळ, 
आपुल्या बरोबर आणि नवा विचार,
नवा आचार, नवा उत्साह, करा पुन्हा सुरवात

ती काळ रात्र सरली, घेऊन आपुल्या बरोबर जे नव्हते खास

कशाला हवा जुना ध्यास, तो उश्वास,
घ्या नावा श्वास, नवी उमेद, नवा ध्यास

नव चैतन्याचा आशावाद, जो सदैव देईल खास
"थोडा है, थोडे की जरुरत है" चा आशावाद

नियती कोणाला चुकली आहे; 
जो आला, तो भोगणार; मग राजा असो वा रंक 
तो भोगणारचं, मात्रा काय तर कमी- जास्त असेल
तेथे नाही कोणाला अपवाद

ही नियती, हे दु:खचं तुम्हाला बनवेल खास,
तुमच्या जाणिवा, संवेदना होतील जाग्या

जेव्हा तुम्ही कराल स्विकार
तो पर्यंत दु:ख नाही सोडणार तुमची पाठ

त्या दु:खचा, संकटांचा करा स्विकार;

मग बघा ती देणार नाहीत त्रास
जे आहे त्याचा करा स्विकार, 
हाच मंत्र आहे.........एक नवा विचार

- सौरभ

Mar 9, 2010

Champions League tonight



Its a Champions League night, footballing competition of highest quality, where top teams of Europe fought for the most prestigious title in football. just can't wait to start the action.
Barcelona was 2009 Champion grabbing whooping 6 trophies including Champions League title, as expected dis year also they are playing great football. other top teams also hoping to do their best like Real Madrid, Manchester United, AC Milan, Inter Milan ect.

David Beckham is playing with AC Milan agaist his old team ManU, ManU is ahead, lets see whether AC Milan can turn the deficit. 

Jose Murinho's  Inter Milan is drawn square with German outfit VFB Stuttgart, i'm really excited about the second leg, hoping that Jose have prepared his team well against German's.

Real's has spend lot of money to buy world's top most players, but the silverware has eluded them, let's see what will happen in this year.

I'm interested in Barcelona, Inter Milan, and also support them.

absolutely LOVE this competition and cn't wait now

Viva Barca, long live Catalunia...........
Best of LUCK Inter Milan and Jose......

Mar 3, 2010

शिवजयंतिच्या निमित्ताने

शिवरायांचे आठवावे रुप, शिवरायांचा आठवावा प्रताप
                      - समर्थ रामदास

सगळ्यांना शिवजयंतिच्या हार्दिक शुभेच्छा.

वरिल प्रमाणे शिवरायांचे गुण आणि त्याचा पराक्रम आठवण्यापेशा आपण त्यांच्या जन्मदिना बद्दल वादविवाद, चर्चा करतोय. शिवजयंतिची सगळ्यांनी एक इवेंट (event) करुन टाकली आहे. शिवरायांच्या कार्याची ओळख करुन घेणे, शिवरायां सारखे आचरण करण्यापेक्शा शिवजयंति साजरी करणे अधिक सोपे आहे.

छ्त्रपतिंन नंतर त्यांच्या तोडिचे व्यक्तिमत्व, काही सन्माननिय अपवाद वगळता महाराष्र्टा मध्ये (मुख्यत: हल्लीच्या काळात स्वातंत्रानंतर) का निर्माण होऊ शकले नाही याचे उत्तर आपल्याला मिळेल. यामुळेच बहुदा "शिवाजि जन्मावा तो दुसरयाच्या घरात, माझ्या नको" या वाकप्रचाराचा जन्म झाला असावा.

शिवरायांनी घेतलेले सतिचे वाण अत्यंत कठिण आहे, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून,  त्यांचा पावलावर पावले टाकणे तर त्याहूनही कठीण; पण अशक्य नक्की नाही. पण हा महाकठीण मार्ग धरण्यापेक्शा मोठ्याप्रमाणात वाजत गाजत शिवजयंति साजरे करणे अधिक सोपे आहे. व हाच मार्ग स्वत: ला शिवरायांचे अनुयायी म्हणवणारे (व शिवराय म्हणजे आपलीच मक्तेदारी समजणारे) राजकारणी अनुसरतात.

शिवरायांचे नाव घेतले की मते मिळतात, लोकांच्या भावना भडकावता येतात. तरी सुजाण जनतेने या सापळ्यात न पडता शिवचरित्र अंगी बाणण्याचा प्रयत्न करावा, तीच शिवरायांना खरी मानवंदना ठरेल.

छ्त्रपतिशिवाजीमहाराजकी जय़, जय महाराष्र्टा.

मनोगत



जीवन हे विरोधाभासांनी भरले आहे, नव्हे जीवन म्हणजेचं विरोधाभास. प्रत्येक पावलागणिक आपल्याला त्याची प्रतिची येते. मलाही आली.

माझ्या प्रतिभेला अशा नाजुक वेळी धुमारे फ़ुटले की, मझ्याचं आश्चर्याला पारावार राहीला नाही.
(माझ्या) प्रतिभेचे अत्युच्च आणि उत्कट प्रदर्शन अथवा माझ्या जीवनातील परमोच्च क्षण वगैरे वर्णन मी करणार नाही. पण माझ्या प्रतिभेचा हा साक्षत्कार माझ्यासाठी तरी सुखद धक्का आहे.


त्याच्या दर्जा बद्दल मी काही बोलणार नाही, नव्हे  ते संयुक्तिक ही होणार नाही. ते काम इतरांनी करावे. मला फ़क्त भावनांना वाट मोकळी करुन द्यायची होती, व तेच मी केले. ज्याप्रमाणे प्रत्येक आईला तीचे मुल अत्यंत प्रिय असते, मग ते कसेही क असेना  ते तिच्यासाठी अत्यंत सुंदर असते. तशीच काहीशी भावना आहे.


बरेच दिवस झाले, मी हल्ली ’सालसा’(salsa dance) क्लासला गेलो नाही. एरवी मी ’सालसा’ न्रुत्याद्वारे स्वत: ला व्यक्त करत होतो. बहुदा तो मार्ग/ माध्यमाचा वापर बंद झाला म्हणुन माझ्यातील प्रतिभेने दुसरया माध्यमाचा वापर करुन स्वत: ला (प्रतिभेला) व्यक्त केले. उदा लेखन, कविता, अभिनय इ. माध्यम कुठलेही असो प्रत्येक व्यक्तीने स्वत: ला व्यक्त केले पाहीजे. कारण आपण शेवटी माणस आहो, जेथे निसर्गातील प्रत्येक गोष्ट स्वत: ला व्यक्त करते, तिथे आपण तरी का मागे रहा. तर मग चला स्वत: ला व्यक्त करुया निडरपणे, निर्भिडपणे कुणाची तमा न बाळगता, कोण काय म्हणेल, काय बोलेल याचा विचार न करता...........व्यक्त होउया.......भावनांना मोकळी वाट देऊ या.......

खाली एक स्वरचित कविता देत आहे.
छंद : मुक्तछंद




कधी कधी वाटतं
जोर जोरात ओरडाव
पण माझा आवाज
पोहोचतचं नाही
या भिंतींन पलिकडे
या अभेद्य भिंती
आपणचं उभारलेल्या
एकमेकांन विरुद्ध
उच्च-नीच, गरीब- श्रीमंत
जाती पातीच्या भिंती
आत्ताच नाही
फार पूर्वी पासुन
म्हणुनच एवढया 
अभेद्य आहेत
मनात आणल तरी
नाही तोडू शकत
आणि नाही त्या
ओलांडू शकत
पण जर सगळ्यांनी
ठरवल तर नक्कीच
उन्मळुन पडतील त्या
पण हे जमेपर्यंत 
का नाही खिडक्या करुया
या भिंतीं  मध्येच

- सौरभ