दिल्लीत राष्ट्रकुल स्पर्धेचा बोजवारा उडाला
कलमाडी कंपनिनेने खेळखंअडोबा केला
क्षमतेपेक्षा जास्त जबाबदारीच्या उचापती
वेटलिफ्टरही मग ऒझे उचलाया लाजती
एकमेकांवर करी आरोपांचे शरसंधान
हे तर धर्नुविद्येतील धनुर्धर महान
पेच-डावपेच लढवी करण्या कुरघोडी
जसे कसलेले पहेलवान-मल्ल आखाडी
उघडे पडल्यावर तोंड लपवित फिरती
जसे काही ५०० मि.ची मँरेथाँन धावती
आपल्या सहका-यांना पाण्यात पाहती
जसे भविष्यातील जलतरणपटु घडवती
जबाबदारीचे चेंडु फर्मास टोलवती
अग्रगण्य टेनिसपटुही मग लाजती
राष्ट्राच्या अब्रूचे जगात धिंडवडे निघाले
काहींचे मात्र पिढयांचे कल्याण झाले