श्वास किती उश्वास किती
जगण्याचे हे त्रास किती
भास किती आभास किती
दु:ख हे सुग्रास किती
कुठूनसा आला सुगंध
नुसतेच हे वास किती
चेहरे का ग्रासलेले?
लोक हे खग्रास किती
अयोद्धेचा राजकुमार
भोगणार हे वनवास किती
जीवंतपणी विसरती सारे
मेल्यावर ही आरास किती
-सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)
© Copyrighted Literature / Any illegal usage will be treated as copyright violation under Indian Copyright Act 1957. All Rights Reserved.
sundar kavita... :-) aavadli jaam
ReplyDelete